रमाबाई साखरे, भारती ठाकूर यांना एमआयटीतर्फे जीवनगौरव पुरस्कार   

पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी) व माईर्स एमआयटीतर्फे प्रयागअक्का कराड यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या  पाच महिलांना ‘पूर्णब्रह्मयोगिनी प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती एमआयटीचे संस्थापक प्रा.डॉ. मंगेश कराड आणि विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.
 
या पंचकन्यांमध्ये आळंदी येथील रमाबाई किसन महाराज साखरे, बडोदा येथील बडोदा संस्थानच्या महाराणी आशाराजे संग्रामसिंहराजे गायकवाड, ज्येष्ठ समाजसेविका भारती ठाकूर, राजस्थान येथील ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ पीस अँड वेलबिईंगच्या राजयोगिनी डॉ. बिन्नी सरीन आणि बद्रिनाथ धाम येथील माणा गावाच्या शिक्षिका व समाजसेविका दमयंती जितवान यांचा समावेश आहे.
 
हा पुरस्कार प्रदान सोहळा २४ मे रोजी सकाळी १० वाजता विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रूई), लातूर येथे होईल. या सोहळ्यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन हे विशेष पाहुणे आहेत. बडोदा संस्थानचे जितेंद्रसिंह गायकवाड यावेळी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड असतील. तसेच, एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड हेही उपस्थित राहणार आहेत.

Related Articles